Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

38. धरणसूक्त | Award Winning Novel

एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात? या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं? विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं? धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी गुंतलेल्या असतात? एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण धरणांची उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून धरणप्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या जगाचा अन् संस्कृतीचा वेध घेणारी अनोखी कादंबरी.

37. साठवणीतील गाणी | Mohammad Rafi | Kishore Kumar | Lata Mangeshkar | Asha Bhosale

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी चित्रपटसृष्टीचं जे सुवर्णयुग अवतरलं त्यात चित्रपटसंगीताचा मोलाचा वाटा होता. या सुवर्णकाळातील चार लखलखती नक्षत्र म्हणजे लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, आशा भोसले आणि किशोर कुमार. या चार गायकांच्या कारकीर्दीचा आढावा घेत त्यांनी गायलेल्या हज़ारो गाण्यांपैकी प्रत्येकी २५ गाण्यांचा रसास्वाद घेणारी सुहास किर्लोस्कर आणि डॉ. मृदुला दाढे लिखित चार नवीन पुस्तकं साठवणीतील गाणी या मालिकेअंतर्गत नुकतीच राजहंसने प्रकाशित केली आहेत.

36. Kishor Kumar Life Journey and Songs | Suhas Kirloskar

हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. ‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर...‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता. ‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर...‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा. या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं? या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण...

35. ऐवज विचारांचा | स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष

भोवतालच्या समाजाचे आणि सामाजिक परिस्थितीचे एका समाजशास्त्रज्ञाच्या चश्म्यातून सतत आकलन करून घेणारे प्रा. स. ह. देशपांडे हे वैचारिक महाराष्ट्राला परिचित असणारे एक नाव. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले आणि महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह असलेले ऐवज विचारांचा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.

34. शह आणि काटशह | Dr Rajeev Joshi | Dr Shreeram Geet

वैद्यकीय क्षेत्र हे त्यातल्या कामच्या तासांमुळे, इमरजन्सी केसेसमुळे कमालीचं धकाधकीचं तर असतंच पण ते तितकंच स्पर्धेचं आणि चुरशीचंही असतं. ही चुरस वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यापासूनच सुरू होते. डॉ. राजीव जोशी लिखित शह काटशह हे पुस्तक १९८७ साली घडलेली अशीच एक सत्यकथा उलगडते. ही कथा आहे वैद्यकीय प्रवेशांमध्ये होणाऱ्या गोंधळाची, त्याविरूद्ध आवाज उठवणाऱ्या लढ्याची, प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची. वैद्यकीय क्षेत्राची सामान्यांना अपरिचित अशी ही बाजू उलगडणाऱ्या या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.